Weather Update महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे की, पाऊस लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची तयारी लगेच पूर्ण करून घ्यावी.
Weather Update मे महिन्याच्या शेवटी उन्हाळा जाणवत आहे. आकाशात सूर्यप्रकाश जास्त आहे. पुढचे काही दिवस पाऊस येणार नाही, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी या कोरड्या हवामानाचा उपयोग करून शेतीची कामं – नांगरणी, वखरणी वगैरे – लवकरात लवकर पूर्ण करावीत. हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, ६ जूनपर्यंत सर्व शेतीची तयारी पूर्ण करावी. ७ जूनपासून राज्यात पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही काम उशिरा करू नये. Weather Update
यावर क्लिक करून जिल्ह्यानुसार हवामान पहा
कोणत्या पिकांची लागवड करावी?
सध्या हळद, मूग आणि उडदासारखी पीकं लावायला योग्य वेळ आहे. खासकरून मूग लवकर लावल्यास उत्पादन चांगलं येतं. जमिनीत एक-दोन फूट ओलावा असल्यामुळे पेरणीसाठी वेळ योग्य आहे. २७ ते २८ जून या तारखांदरम्यान राज्यातील बरेच शेतकरी सोयाबीन, मूग आणि कापूस यांची पेरणी करतील. या वेळात सगळीकडे खरीप हंगाम सुरू होईल. शेतकरी खूप व्यस्त असतील. Weather Update
पहिल्या पावसाच्या काही दिवसांनी, म्हणजे १३ ते १७ जूनच्या दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस पडेल. यामुळे नाले, ओढे भरतील आणि पाण्याचा साठा वाढेल. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असेल. राज्यात जिथं अजून पाऊस पडलेला नाही, तिथेही या दोन वेळच्या पावसात पाणी पडेल. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाणी पडेल आणि सगळ्या भागांतील शेतकऱ्यांना फायदा होईल. Weather Update
आपले आजोबा-आजी सांगतात की, ज्या वर्षी कडुलिंबाच्या झाडाला जास्त फळं लागतात, त्या वर्षी चांगला पाऊस होतो. यावर्षी असंच झालंय. त्यामुळे पारंपरिक चिन्हं आणि हवामान तज्ज्ञांचं म्हणणं दोघंही सांगत आहेत की पावसाळा चांगला येणार आहे. Weather Update